
MES Bal Vikas Mandir, Saswad
सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२ ३०१
Established in 11 June 1986
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्गसुंदर पुरंदर तालुक्यातील नावाजलेली उपक्रमशील शाळा म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना ११ जून १९८६ साली झाली. सन २०१०-११ हे रौप्यमहोत्सवी वर्ष, या वर्षांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले. ११ जून १९८६ ते आजपर्यंत शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय प्रगतीचा आढावा थोडक्यात घेत आहे . बदलत्या काळानुरूप शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना केली. सुरुवातीला शाळेमध्ये ४७ विद्यार्थी होते.आज ६४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- उपक्रमशील शाळा
- भव्य क्रीडांगण
- प्रशिक्षित शिक्षक वृंद
- सेमी इंग्रजी वर्ग
- बाह्य परीक्षांना वाव
- शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रेसर
- निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण
- विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग
- शिस्तबद्ध छात्रगण
- १००% उपस्थिती पट नोंदणी
- अप्रगत विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास
- पालकांसाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
- सर्व सण-उत्सव साजरे केले जातात.
- माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा
- कलेसाठी स्वतंत्र शिक्षक
- माता-पालक,पालक-शिक्षक संघ
- शाला-व्यवस्थापन, परिवहन, पोषण आहार समिती
- तंत्रस्नेही शिक्षक
- उत्तम ऑनलाइन अध्यापन
- शिक्षणप्रबोधिनी तर्फे शिक्षकांना अद्ययावत अध्यापनशास्त्राचे सतत मार्गदर्शन
- प्रभावी इंग्रजी अध्यापन
- शिक्षक-विद्यार्थी गुणवत्ता विकासात कायम अग्रेसर
- आंतरशालेय क्रीडा स्पर्धा
- NEP-२०२०ची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन डिजिटल ज्ञानरंजन वर्गाची सन २०२२-२३ पासून सुरुवात ( मातृभाषेतील शालेय शिक्षणाबरोबर संस्कृत, Spoken English, संगणक, संगीत, चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा या विषयांचा समावेश )
- शाळा एक डिजिटल कॅम्पस (संगणकीकृत निकाल,विद्यार्थी माहिती व हजेरी)
- ग्रंथालय
- मुबलक स्वच्छ पाणीपुरवठा
- स्वच्छ प्रसाधनगृहे
- बोलक्या भिंती व विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी आकर्षक खेळणी
- शालेय पोषण आहार
- विद्यार्थी मार्गदर्शनासाठी व्यक्तिमत्व विकास केंद्र
विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा शाळा नेहमीच प्रयत्न करते.
‘प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं. फुलण्यासाठी त्याला एक मोकळं आभाळ हवं असतं.’ या ओळीप्रमाणे शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, नीटनेटकेपणा इ. सुप्त गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो.
