Month: July 2018

“जगभरातील सर्वोत्तम शिक्षण मराठी माध्यमातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल आणि अशा शिक्षणाच्या बळावर तो खेड्यात किंवा जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी तो उत्तम काम करु शकेल,” अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आज येथे दिली. सोळंकी हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील सर्व शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षा (इ. १०वी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१२वी) यामध्ये प्रथम आलेल्या ३५ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, किशोर पंप्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक किशोर देसाई, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. कर्वे रस्त्यावरील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. मएसो ज्ञानवर्धिनीतर्फे यावर्षीपासून इ. ६ वी तील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तिकेचे प्रकाशन विशाल सोळंकी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. “आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी ज्याप्रमाणे देशात क्रांतीची मशाल पेटवली, त्याचप्रमाणे देशात आता नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करू शकेल,” असा विश्वास सोळंकी यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याचे काम शाळा करते. आता मात्र तुम्हाला स्वतःचा प्रवास स्वतःच करायचा आहे. त्यामुळे स्वतःसा ओळखायला शिका. जीवनात आपल्याला काय करायचे आहे ते आत्ताच ठरवा, त्यातूनच समाधान मिळेल आणि कामाचा आनंद मिळवू शकाल. जिद्द असलेल्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाला नियती नेहमीच साथ देते. आपला प्रत्येक विद्यार्थी यशस्वी आणि चांगला नागरीक कसा होईल यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कायमच प्रयत्नशील राहिली आहे. संस्थेने तुम्हाला आत्तापर्यंत सर्वकाही दिले आहे आता संस्थेला तुमचा अभिमान वाटेल असे काम करून दाखवा.” किशोर देसाई आपल्या भाषणात म्हणाले, “ जगात आपली कोणत्यातरी एका कौशल्यासाठी ओळख असणे गरजेचे आहे, परंतू एका विषयात प्रावीण्य मिळाले म्हणून थांबणे योग्य ठरणार नाही. शालेय-महाविद्यालयीन जीवनात जास्तीत जास्त अनुभव घेतला पाहिजे, त्यातून संवेदनशीलता वाढते. संवेदनशीलता वाढण्यासाठी मातृभाषेतून शिकण्याचीही आवश्यकता आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आपल्या शिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षक घडवित आहे ही बाब कौतुकास्पद आहे कारण ज्या संस्थांना शिक्षकाचे महत्व कळते त्या संस्थेचे विद्यार्थी खूप मोठे होतात. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षमाबाबत निर्णय घेत असताना आपल्या देशात आता खूप संधी आहेत याचे भान बाळगणे आवश्यक आहे. सर्वच कंपन्या संशोधनाच्या कामासाठी फार मोठी गुंतवणूक करत असल्याने भविष्यात शास्त्रज्ञांची फार मोठी गरज लागणार आहे. आज आपल्या देशात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, परंतू शारीरिक कष्ट करावे लागणाऱ्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे, ही गंभीर बाब आहे. जीवनात न्याय, निती आणि धर्माने वागून यश मिळवता येते त्यामुळे काहीही करून मोठे होण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ देवू नका. समाजासाठी केलेले काम हे परमेश्वरासाठी केलेले काम असते त्यातून मनःशांती मिळते आणि समाजात चांगुलपणाही मिळतो.” गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने मानस गाडगीळ आणि आकांक्षा बुटाला या विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि त्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. गोविंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

 

 

“परिस्थिती आपल्याला शिकवत असते, पण आपण त्यातून काय शिकतो हे महत्वाचे आहे. केवळ अभ्यासातच हुशार असून चालणार नाही. अभ्यासात हुशार नसतानाही अनेकजण जीवनात यशस्वी होतात. सौ. विमलाबाई गरवारे यांनी कायम भविष्याचा वेध घेतला. महाराष्ट्रातील मुले-मुली हुशार आहेत, परंतू ती स्वतःला व्यक्त करण्यात आणि सादरीकरणात कमी पडत असल्याने त्यांची हुशारी दिसून येत नाही. त्यामुळे बोलायला शिका, त्यातूनच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सापडत जातात. प्रत्येकाने अवांतर वाचन केले पाहिजे, मनःशांती, तणावमुक्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कलागुण जोपासले पाहिजेत,” असा सल्ला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील सुतावणे यांनी माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंतांना दिला. 

सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जन्मदिनानिमित्त माध्यमिक शालांत परिक्षेत (इ. १० वी) उल्लेखनीय यश मिळवलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा शनिवार, दि. १४ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. विमलाबाई गरवारे यांच्या शाळेतील अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, शाळेचे महामात्र सुधीर गाडे, मुख्याध्यापक अविनाश वाघमारे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड व शाळेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

माध्यमिक शालांत परिक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळवलेला चिन्मय उदय दामले (९५.६० टक्के), दुसरा क्रमांक मिळवलेली गौरी नंदकुमार कोंडे (९२.६० टक्के) तसेच विभागून तिसरा क्रमांक मिळवलेल्या नेहा विनोद बाफना आणि अंकिता दिनेश पाटील (प्रत्येकी ९२.४०टक्के) या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गरवारे ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी पांच हजार रुपयांचे पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन कौतुक करण्यात आले. 

कु. नेहा विनोद बाफना या विद्यार्थिनीने प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत मांडले. 

अबोली साने आणि आर्या पळशीकर या विद्यार्थिनींनी सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. 

शाळेचे महामात्र सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “प्रत्येकाची परिस्थिती भिन्न असते. परंतू दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची, समाजाला देण्याची परंपरा आपल्या देशात आहे. सौ. विमलाबाई आणि आबासाहेब गरवारे हे दांपत्य त्याचेच उदाहरण आहे. नोकरीचा विचारही न करता व्यवसायात मानाने उभे राहण्यासाठी सौ. विमलाबाईंनी आबासाहेबांना पूर्णपणे पाठिंबा दिला. आपल्या मुलांना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळेतच घातले. त्यासाठी मुलांना परदेशातही पाठवले. लग्न होऊन एकत्र कुटुंबात गेल्यानंतर त्यांनी कुटुंब उत्तम प्रकारे सांभाळले परंतु भविष्याचा विचार करून त्यांनी आपल्या मुलांमधील भावबंध घट्ट करत स्वतंत्र संसार थाटायला लावला. नरसेवा हीच नारायण सेवा ही शिकवण आचरणात आणून त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांच्या जीवनातून मिळणारी ही शिकवण आजच्या विद्यार्थिनींनी आचरणात आणली पाहिजे आणि हीच सौ. विमलाबाई गरवारे यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका अर्चना लडकत यांनी केले.

 

 

Career Counseling Group (CCG), ICAI jointly with Pune Branch of WIRC of ICAI in support with IQAC Savitaribai Phule Pune University and MES Garware College of Commerce organized 5 Days Workshop on ‘GST’- Girls Students Empowerment Through Skill Building on 01st July 2018 from 08.00 am to 01.00 pm at Savarkar Sabhagruha.

During the program Chief Guest Dr. Prafulla Pawar (Dean – Faculty of Commerce & Management, Savitribai Phule Pune University), Guest of Honour CA Uday Gujar (Member of Pune Branch of WIRC of ICAI), Speaker CA Shailesh Rathi, Dr. Anand Y. Lele (Officiating Principal), CA Sudam D Ghongatepatil (Vice Principal), CA Ruta Chitale were present. 

The main objective of this workshop is to Empowering Girls through Skills, Knowledge, and Leadership & increase access to decent employment and entrepreneurial opportunities. The seminar witnessed participation of over 75 Girls Students from GCC as well as from other colleges. 

A technical session was conducted which focused on various important issues related to Introduction to GST & Supply, Levy & Collection of GST and place of Supply, Time and Value of Supply, Input Tax Credit, Registration, Invoice and Records, Payment of tax, GST Return, and Miscellaneous provisions.

The seminar concluded with a session on ‘Questions and Answers’ in which clarifications were given to many queries particularly pertaining to sectors of exports, transport, real estate etc.

 

 

शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आता शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून सोलापूरसारख्या बहुसांस्कृतिक शहरात आपल्या शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. ‘मएसो’ने MES Public School, Solapur ही विनाअनुदानित पूर्वप्राथमिक शाळा सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन रविवार, दि. १ जुलै २०१८ या दिवशी स्व. काका महाजनी स्मारक विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा. श्री. दामोदरजी दरगड यांच्या शुभ हस्ते आणि मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शाळेची प्रथम विद्यार्थिनी उपस्थित होती. याप्रसंगी गणेश पूजन व सरस्वती वंदन करण्यात आले. मएसोच्या परिवारातील इंग्रजी माध्यमाची ही ८ वी शाळा आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बाळे येथील नियोजित शैक्षणिक प्रकल्पाच्या जवळच ही शाळा सुरु करण्यात आली आहे. 

शाळेच्या उद्धाटनानंतर बाळे येथील नियोजित संकुलाच्या ठिकाणी “स्व. काका महाजनी शैक्षणिक संकुला”च्या नामफलकाचे अनावरण व वृक्षारोपण करण्यात आले.

या सर्व प्रसंगी शाला समितीचे अध्यक्ष व मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. आनंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाला समितीचे सदस्य व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य श्री. विनय चाटी व श्री. गोविंद कुलकर्णी तसेच स्व. काका महाजनी स्मारक विश्वस्त समितीचे कार्यवाह श्री. राजेंद्र काटवे, सदस्य श्री. रंगनाथ बंकापूर, श्री. अशोक संकलेचा, श्री. संतोष कुलकर्णी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर शहर कार्यवाह श्री. फडके, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. विनय चाटी, श्री. संतोष कुलकर्णी व संस्था कार्यालयातील श्री. मनोज साळी, श्री. राजेश दुसाने व श्री. मोरेश्वर पनवेलकर यांनी विशेष प्रयत्न केले.

या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे :